शेतकऱ्यांसाठी आली गुड न्यूज.! शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे 100 टक्के अनुदानावर मोफत मिळणार असा करा अर्ज May 30, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत गळीतधान्य योजनेंतर्गत आता शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर मोफत प्रमाणित सोयाबीन बियाणे उपलब्ध होणार आहे. यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी २९ मेपर्यंत महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे .योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी अधिकृत अशा महाडीबीटी https://mahadbt.maharashtra.g ov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin पोर्टलवर ऑनलाइन अर्ज सादर करणे अनिवार्य आहे. कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेताना अॅग्रिस्टॅकवर नोंदणी असणे बंधनकारक आहे हे सुद्धा वाचा:- शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा सोनेतारण कर्जात झाले हे मोठे बदल येथे क्लिक करून बघा . अर्ज मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना ५ वर्षाच्या आतील बियाणे तालुकास्तरावरील डीलरकडे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना सहजपणे बियाणे प्राप्त करून घेता येणार आहे.योजनेचा लाभ किमान २० आर ते कमाल १ हेक्टर क्षेत्रासाठी घेता येईल. बीबीएफ, रुंद वरंबा सरी, टोकन पद्धतीने लागवडीकरिता एकरी २२ किलो, याप्रमाणे एका शेतकऱ्यास जास्तीतजास्त २ बॅगचा लाभ दिला जाणार आहे. हे सुद्धा वाचा:- शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा सोनेतारण कर्जात झाले हे मोठे बदल येथे क्लिक करून बघा पीक प्रात्याक्षिकाची अंमलबजावणी करताना, शेतकरी निवड सर्वसाधारण ७५ टक्के, अनुसूचित जाती १७टक्के, अनुसूचित जमाती ८ टक्के याप्रमाणे करण्यात येईल. यामध्ये लाभार्थ्यांपैकी ३० टक्के महिलांची निवड करण्यात येणार आहे. निवड झालेल्या शेतकऱ्याच्या याद्या २९ मे रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत पोर्टलवर उपलब्ध होर्डल. तसेच निवड झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाइलवर वैयक्तिक संदेशही प्राप्त होतील. ५ दिवसांच्या आत बियाण्याची उचल करून घेणे आवश्यक आहे. योजनेमुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढण्यास आणि आर्थिक सक्षमीकरण होण्यास मदत मिळणार आहे. विशेषतः सोयाबीन लागवडीसाठी होणारा बियाण्याचा खर्च पूर्णपणे वाचणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.