नमस्कार मित्रांनो भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) गेल्या सप्ताहात एलटीव्ही रेशो वाढविण्यासह सोने व चांदी यांच्या तारण कर्जाशी संबंधित ८ नियमांत बदल केला आहे. नवे नियम सर्व व्यावसायिक बँका, बिगर बँक वित्तीय संस्था (एनबीएफसी), सहकारी बँका आणि गृहवित्त (हाउसिंग फायनान्स) कंपन्या यांना लागू असतील
१ एप्रिल २०२६ पासून त्यांची अंमलबजावणी होईल.
हे सुद्धा वाचा:- कर्ज घेणाऱ्यांसाठी खुशखबर या पाच बँकेचे कर्ज झाले स्वस्त येथे बघा व्याजदर
सोन्याच्या किमतीच्या ८५ टक्के कर्ज मिळेल.
उत्पन्नाचा पुरावा व क्रेडिट स्कोअर यांची २५ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी गरज राहणार नाही.
मुद्दल व व्याज मुदतीच्या शेवटी भरण्यासाठी १२ महिन्यांची मुदत निश्चित.
सोने-चांदी तारण ठेवण्याची कमाल मर्यादा सोन्याचे दागिने – १ किलो, सोन्याचे शिक्के – ५० ग्रॅम, चांदीचे दागिने – १० किलो.
हे सुद्धा वाचा:- कर्ज घेणाऱ्यांसाठी खुशखबर या पाच बँकेचे कर्ज झाले स्वस्त येथे बघा व्याजदर
कर्ज बंद झाल्यानंतर ७ कामकाज दिवसांच्या आत सोने-चांदी परत न केल्यास ग्राहकास मिळणार दररोज ५ हजार रुपयांची भरपाई.
सोने-चांदी चोरी झाले किंवा खराब झाल्यास पूर्ण भरपाई मिळणार.
कर्ज न फेडल्यास सोन्याचा लिलाव करण्याआधी ग्राहकास नोटीस द्यावी लागेल.
कर्जाच्या अटी स्थानिक भाषेत असतील.