नमस्कार मित्रांनो 27 मार्च 2025 पासून रेशन कार्डधारक आणि गॅस ग्राहकांसाठी काही नव्या नियमांची अंमलबजावणी होणार आहे. हे बदल केंद्र सरकारच्या निर्देशानुसार होत असून त्याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांवर होणार आहे.
हे सुद्धा वाचा:- राज्य सरकारचा मोठा निर्णय या शेतकऱ्यांच्या खात्यावर सरकार करणार 20 हजार रुपये जमा
यामुळे रेशन आणि गॅस सबसिडीशी संबंधित प्रक्रियेत पारदर्शकता आणि अचूकता आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.एकाच कुटुंबात एकापेक्षा जास्त रेशन कार्ड असल्यास, 27 मार्चपासून त्याची छाननी होणार आहे. डुप्लिकेट कार्ड्स ओळखून ते स्वयंचलितपणे रद्द केले जातील.सर्व रेशन कार्डधारकांना आधार लिंकिंगसह e-KYC पूर्ण करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. हे न केल्यास शिधा पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो.योजनेअंतर्गत कोणत्याही राज्यात रेशन मिळण्याची सुविधा लागू राहील, परंतु लाभार्थ्याची माहिती अपडेट असणं आवश्यक आहे.
डिलिव्हरी OTP सक्तीची:
सिलिंडर घरपोच मिळवताना आता ग्राहकाला मोबाईलवर आलेला OTP सांगणे आवश्यक राहील. OTP शिवाय सिलिंडर डिलिव्हरी केली जाणार नाही.
हे सुद्धा वाचा:- राज्य सरकारचा मोठा निर्णय या शेतकऱ्यांच्या खात्यावर सरकार करणार 20 हजार रुपये जमा
सबसिडी खात्यात थेट जमा:
गॅस सबसिडी थेट खात्यावर जमा केली जाते. मात्र, आधार आणि बँक खाते लिंक नसेल, तर सबसिडी मिळणार नाही.
वैयक्तिक वापरासाठी मर्यादित सिलिंडर:
एका वर्षात प्रत्येक कुटुंबाला ठराविक संख्येच्या सिलिंडरपर्यंतच सबसिडी लागू असेल. जास्त सिलिंडर घेतल्यास सबसिडी नाकारली जाऊ शकते.