शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी.! पी एम किसान योजनेत मोठे बदल 15 एप्रिल तारखेपासून लागू होणार ही मोहीम March 15, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो केंद्र सरकार देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध योजना राबवत आहे. या योजनांच्या माध्यमातून गरिब नागरिकांना आर्थिक पाठबळ देण्याचा सरकारचा प्रयत्न असतो.यातीलच एक महत्वाची योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana). हे सुद्धा वाचा:- स्टेट बँकची ही योजना देणार महिन्याला 6 हजार रुपये असा करा लगेच अर्ज देशातील शेतकऱ्यांना (Farmers) आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान योजना राबवण्यात येते. या योजनेसंदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. जे शेतकरी या योजनेशी अद्याप जोडले गेले नाहीत, त्यांना या योजनेचा लाभ घेण्याची संधी मिळणार आहे. केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लोकसभेत दिलेल्या माहितीप्रमाणे पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत सर्व पात्र शेतकऱ्यांना 6000 रुपयांचा वार्षिक लाभ मिळतो. हे सुद्धा वाचा:- स्टेट बँकची ही योजना देणार महिन्याला 6 हजार रुपये असा करा लगेच अर्ज मात्र, जे शेतकरी या योजनेशी काही कारणामुळं जोडले गेले नाहीत, त्या शेतकऱ्यांना देखील योजनेशी जोडण्याची संधी मिळणार असल्याचे चौहान म्हणाले. पात्र शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेशी जोडण्यासाठी सरकारकडून मोहीम राबवली जात आहे. यामध्ये तीन मोहिमा राबवण्यात आल्या असून चौथी मोहीम 15 एप्रिलपासून सुरू होणार आहे. केंद्रीय कृषिमंत्र्यांनी राज्य सरकारांना या योजनेंतर्गत पात्र असलेल्या अशा शेतकऱ्यांची ओळख करुन देण्यासाठी सरकारला मदत करण्यास सांगितले. अशा शेतकऱ्यांना मागील थकबाकीची रक्कमही देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. देशातील शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मोबाईल ॲप आणि पीएम किसान पोर्टलही सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, अद्यापही ज्या शेतकऱ्यांनी प्रक्रिया पूर्ण केली नाही, त्यांनी ही प्रक्रिया पूर्ण करावी असं आवाहन करण्यात आलं आहे. अनेक शेतकरी पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत नोंदणीकृत आहेत, परंतु तरीही लाभाची रक्कम त्यांच्या खात्यात पोहोचत नाही. याची अनेक कारणे असू शकतात. जसे की ई-केवायसी झाली नाही, लाभार्थी शेतकऱ्याच्या जमिनीची पडताळणी झालेली नाही किंवा अर्ज करताना शेतकऱ्याने काही चूक केली आहे. केंद्रीय मंत्र्यांनी शेतकऱ्यांना योजनेच्या लाभाची रक्कम त्यांच्या खात्यात वेळेवर पोहोचण्यासाठी सर्व आवश्यकता पूर्ण करण्यास सांगितले आहे. या योजनेंतर्गत आतापर्यंत 19 हप्ते जारी करण्यात आले आहेत. आता शेतकरी 20 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत.