Pik Vima Scheme Updateनमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली.

यावेळी सरकारने अनेक महत्वाचे निर्णय घेतले ज्यात सुधारित पद्धतीने पीक विमा योजना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.खरंतर मागील काळात पीक विमा योजना चालवत होतो
हे सुद्धा वाचा:- लाडक्या बहिणींसाठी खुशखबर लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार येथे बघा तुमच्या खात्यात होणार का
, त्यामध्ये अनेक घोटाळे पाहायला मिळाले. एक रुपयात पीक विमा योजना सुरु केल्यानंतर लाखो बोगस अर्ज या पाहायला मिळाले. हजारो कोटींचा अपव्यय होतोय, अशी षड्यंत्र लोकांनी केले. गरजू शेतकरी ते वंचित राहतील अशा प्रकारची अवस्था येऊ नये हा विचार करुन सुधारित पद्धतीनं योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. विमा कंपनीचा लाभ होऊ नये तर शेतकऱ्याचा लाभ झाला पाहिजे, अशा प्रकारे ही विमा योजना नव्यानं तयार करण्यात आली आहे.मोठ्या प्रमाणात शेतीच्या क्षेत्रात गुंतवणूक करणं, वेगवेगळ्या प्रकारे, ड्रीप, मल्चिंग पेपर, बीबीएफ अशा वेगवेगळ्या गोष्टी आवश्यक आहेत, त्यात गुंतवणूक वाढवायची यासाठी स्वतंत्र योजना मंत्रिमंडळानं मान्य केली आहे,
हे सुद्धा वाचा:- लाडक्या बहिणींसाठी खुशखबर लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार येथे बघा तुमच्या खात्यात होणार का
अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.नेमका निर्णय काय?सर्वसमावेशक पीकविमा योजनेत बदल करून केंद्र सरकारच्या अनिवार्य जोखीम बाबीवर आधारित पीकविमा योजना राबवण्यात येईल. तसेच कृषि क्षेत्रातील भांडवली गुंतवणूक वाढवण्यासाठी कृषि पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देणारी योजना राबवली जाणार आहे.