मोठी खुशखबर सरकार देणार शेतकऱ्यांना 5 लाख रुपये पर्यंत बिनव्याजी कर्ज लगेच पहा अर्ज प्रकिया March 5, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2025 मध्ये किसान क्रेडिट कार्ड (KCC) च्या कर्जाची मर्यादा 3 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये करण्याची घोषणा केली. शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा भागविणे, कृषी क्षेत्रात आर्थिक प्रगतीसह ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे हे सुद्धा वाचा:- शेतकऱ्यांना जिल्ह्यानुसार नुकसान भरपाई झाली जाहीर येथे यादीत आपले नाव तपासा .मार्च-एप्रिल 2024 पर्यंत या योजनेअंतर्गत 7.75 कोटी सक्रिय खाती होती आणि एकूण 9.81 लाख कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले होते. यावरून ही योजना शेतकऱ्यांसाठी किती महत्त्वाची आहे, हे दिसून येतेयंदाच्या अर्थसंकल्पात किसान क्रेडिट कार्ड योजनेत कर्जाची मर्यादा 3 लाखांवरून 5 लाख रुपये करण्यात आली आहे. या बदलामुळे शेतकऱ्यांना अधिक आर्थिक पाठबळ मिळेल आणि डिजिटल आर्थिक समावेशना देखील चालना मिळेल.किसान क्रेडिट कार्डमध्ये पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर (PIN) आणि इंटरनॅशनल आयडेंटिफिकेशन नंबर (IIN) असतो. हे मॅग्नेटिक स्ट्राईप कार्ड म्हणून काम करते.आता शेतकरी ATM मधून सहज पैसे काढण्यासाठी या कार्डचा वापर करू शकतील, ज्यामुळे गरजेच्या वेळी सहज कर्ज उपलब्ध होईल. हे सुद्धा वाचा:- शेतकऱ्यांना जिल्ह्यानुसार नुकसान भरपाई झाली जाहीर येथे यादीत आपले नाव तपासा सुधारित व्याज अनुदान कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना आता पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकणार आहे.किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत 3 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर सवलतीचा व्याजदर 7 टक्के आहे. जर एखाद्या शेतकऱ्याने वेळेत कर्जाची परतफेड केली तर त्याला 3 टक्के व्याज अनुदान मिळते, ज्यामुळे अंतिम व्याज दर 4 टक्क्यांपर्यंत कमी होतो.मात्र, तीन लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या कर्जावर विविध बँकांचे व्याजदर लागू असतील, त्यामुळे शेतकऱ्यांनी आपापल्या बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन माहिती घ्यावी किंवा कस्टमर केअरशी संपर्क साधावा, असा सल्ला देण्यात आला आहे.