खुशखबर! मुलींच्या लग्नासाठी सरकार करतंय 20 हजार रुपयांची आर्थिक मदत येथे बघा अर्ज कसा करायचा May 30, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो लेकीच्या जन्म झाल्यापासूनच तिच्या आईवडिलांना तिची काळजी असते. तिचे शिक्षण, लग्न या सर्व गोष्टींसाठी आईवडिल फार पूर्वीपासूनच पैसे साठवत असतात. मुलींचे लग्न मोठ्या धुमधडाक्यात करावे, अशी प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते.परंतु अनेकदा परिस्थितीमुळे असं काही करता येत नाही. त्यामुळेच राज्य सरकारने खास योजना सुरु केली आहे. महाराष्ट्र सरकारने मुलींच्या शिक्षणासाठी खास कन्यादान योजना राबवली आहे हे सुद्धा वाचा:- शेतकऱ्यांसाठी खुशखबर शेतकऱ्यांना सरकार पाच लाख रुपये पर्यंत तात्काळ कर्ज देणार येथे क्लिक करून अर्जप्रकिया बघा . राज्य सरकारच्या कन्यादान योजनेत मुलींच्या लग्नाचा खर्च केला जातो. अनुसूचित जातीच्या मुलींच्या पालकांना लग्नासाठी मदत केली जाते. गरीब कुटुंबातील मुलींना लग्नासाठी मदत व्हावी, या हेतूने ही योजना राबवली आहे.लग्नासाठी खर्च कमी व्हावा, यासाठी सामूदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाते. यासाठी स्वयंसेवी संस्थाना प्रोत्साहन दिले जाते. यासाठी राज्य सरकारने कन्यादान योजना सुरु केली आहे.कन्यादान योजनेत नवीन लग्न झालेल्या वधूवरांना २०,००० रुपयांची मदत केली जाते.मुलीच्या आईवडिलांच्या नावाने ही मदत केली जाते. जेणेकरुन हे पैसे ते लग्नासाठी वापरु शकतात.या योजनेअंतर्गत वधू-वरांना सामुदायिक विवाह सोहळ्यात लग्न करावे लागते. तसेच विवाहसोहळ्याचे आयोजन करणाऱ्या संस्थेला ४००० रुपये दिले जातात. हे सुद्धा वाचा:- शेतकऱ्यांसाठी खुशखबर शेतकऱ्यांना सरकार पाच लाख रुपये पर्यंत तात्काळ कर्ज देणार येथे क्लिक करून अर्जप्रकिया बघा योजनेसाठी अर्ज करणारे वधू-वर महाराष्ट्राचे रहिवासी असावे. त्यांच्यापैकी एकजण तरी अनुसूचित जातीचा असावा. नवऱ्याचे वय २१ तर नवरीचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे. प्रथम विवाहासाठी हे अनुदान दिले जाते. या योजनेच्या लाभार्थ्यांनी बाल विवाह प्रतिबंध कायदा किंवा हुंडा प्रतिबंध कायद्याचा भंग केलेला नसावा. तसेच जातीचे प्रमाणपत्र हे अधिकाऱ्यांनी दिलेले असावे.