Free Electricity Schemes 2025नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजनेबाबत शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मोठी घोषणा केली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आता गरिबांना मोफत वीज आणि ५०,००० रुपयांची अतिरिक्त अनुदान देण्यात येईल अशी माहिती शिवराज सिंह चौहान यांनी केली आहे. पुण्यातील बालेवाडी येथील एका कार्यक्रमात बोलत होते.

हे सुद्धा वाचा:- शेतकऱ्यांसाठी खुशखबर.! शेतकऱ्यांच्या खात्यात 20 हजार रुपये जमा होणार येथे बघा पात्र शेतकरी
याप्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.यावेळी शिवराज सिंह चौहान म्हणाले, आता प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याच्या घरी सौर पॅनेल बसवले जातील. यामुळे त्यांना आयुष्यभर मोफत वीज मिळेल. एवढच नव्हे तर सरकार कडून ५०,००० रुपयांचे अतिरिक्त अनुदान देखील दिले जाईल. ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात हस्तांतरित केली जाईल. सरकारच्या या उपक्रमामुळे गरिबांना आर्थिक मदत तर मिळेलच, शिवाय पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने एक मोठे पाऊलही पडेल.पंतप्रधान आवास योजना ही केवळ घरे देण्याची योजना नाही तर ती गावांमध्ये रोजगार आणि स्वावलंबनाला चालना देण्याचे एक साधन आहे.
हे सुद्धा वाचा:- शेतकऱ्यांसाठी खुशखबर.! शेतकऱ्यांच्या खात्यात 20 हजार रुपये जमा होणार येथे बघा पात्र शेतकरी
घरांच्या बांधकामादरम्यान गवंडी, सुतार, लोहार, सिमेंट-वाळू विक्रेते आणि इलेक्ट्रिशियन अशा अनेक लोकांना रोजगार मिळतो. आता सौर पॅनेल बसवल्यामुळे टेक्निशियन लोकांनाही गावातच चांगला रोजगार मिळेल. गेल्या वर्षी ९ जून रोजी मी मंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली आणि अवघ्या एका वर्षात ३० लाखांपेक्षा जास्त गरिबांना कायमस्वरूपी घरे देण्यात त्यांना यश आलं… आपण हि योजना फक्त कागदावरच नव्हे तर जमिनीवरही राबवली. महाराष्ट्रातील १० लाखांहून अधिक ग्रामीण कुटुंबांना या योजनेअंतर्गत घरांसाठी मंजुरी देण्यात आली आहे. राज्य सरकारने आतापर्यंत ग्रामीण गृहनिर्माण योजनांवर ६५,००० कोटी रुपये खर्च केले आहेत, अशी माहिती शिवराजसिंग चौहान यांनी दिली.