शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी.! फार्मर आयडी कार्ड नसेल तर मिळणार नाही आता पिक विमा योजनेचा लाभ

नमस्कार मित्रांनो यंदाच्या मृग बहारातील फळपीक विमा योजनेचे अर्ज भरणे सुरू झाले असून वेगवेगळ्या फळपीकांसाठी अर्जासाठीची अंतिम मुदत वेगवेगळी आहे.

 

फळपीक विमा योजना राज्यात भारतीय कृषि विमा कंपनी, बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनी, फ्युचर जनरली इन्शुरन्स कंपनी व युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी या विमा कंपन्यांमार्फत राबविण्यात येत आहे.पण यंदा फळपीक विम्यासाठी अर्ज करायचा असेल तर कृषी विभागाने एक महत्त्वाची अट घातली आहे.

 

हे सुद्धा वाचा: शेतकऱ्यांच्या खात्यात ३६ हजार रुपये जमा होणार येथे बघा अर्ज कुठे करायचा 

दरम्यान, राज्य स्तरीय पीक विमा समन्वय समिती मध्ये दिलेल्या सुचनांनुसार, कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आयडी (Farmer ID) अनिवार्य करण्यात आलेला आहे. त्यामुळे पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना मृग व आंबिया बहार साठी अॅग्रिस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक (Farmer ID) असणे बंधनकारक आहे. ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसेल अशा शेतकऱ्यांना फळपीक विमा योजनेमध्ये सहभाग घेता येणार नाही.

हे सुद्धा वाचा: शेतकऱ्यांच्या खात्यात ३६ हजार रुपये जमा होणार येथे बघा अर्ज कुठे करायचा 

 

गावपातळीवर शेतकऱ्यांना अॅग्रिस्टॅक अंतर्गत नोंदणी करता येत असून फार्मर आयडी देण्यात येतो. कृषी विभागाच्या माहितीनुसार अग्रिस्टॅक अंतर्गत नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ही एक कोटींच्या वर गेली असून बहुतेक शेतकऱ्यांनी अजूनही नोंदणी केलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फार्मर आयडी काढून घेणे गरजेचे आहे. फळपीक विमा योजनेबरोबरच खरिपातील पिकांच्या विमा अर्जासाठीसुद्धा फार्मर आयडी आवश्यक असणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसेल अशा शेतकऱ्यांना शासनाच्या कोणत्याच योजनेचा लाभ मिळणार नाही. कृषी विभागाकडूनही जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फार्मर आयडी काढून घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Comment