शेतकऱ्यांसाठी खुशखबर शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे पैसे झाले जमा येथे बघा यादीत तुमचे नाव आहे का

.Crop Insurance 2025 Wear नमस्कार मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना खरिप हंगाम २०२४ मधील पीक नुकसानीपोटी २ हजार ३०८ कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली. त्यापैकी १४ एप्रिलपर्यंत १ हजार ४०० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले.राज्यातील शेतकऱ्यांना पीक नुकसानीपोटी विविध ट्रीगरमधून नुकसान भरपाई मंजूर झाली. स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबींमधून २२ जिल्ह्यांना भरपाई मिळणार आहे

 

हे सुद्धा वाचा:- लाडक्या बहिणींना मिळणार मोफत गॅस सिलेंडर येथे बघा अर्ज प्रक्रिया

. यात धुळे, नंदूरबार, पुणे, अहिल्यानगर, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अमरावती, अकोला, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे.राज्यात यंदा यवतमाळ, नांदेड, परभणी आणि हिंगोली या चार जिल्ह्यांमध्ये २५ टक्के अग्रीम भरपाई देण्यासाठी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढल्या होत्या. त्यापैकी यवतमाळ जिल्ह्यात कंपनीने अधिसूचना फेटाळत अग्रिम भरपाई देण्यास नकार दिला. तर नांदेड, परभणी आणि हिंगोली या तीन जिल्ह्यांमध्ये अग्रिम भरपाई मिळणार आहे. या तीन जिल्ह्यांमधील १८ लाख ८४ हजार शेतकऱ्यांना ७०५ कोटी रुपयांची अग्रिम भरपाई मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा:- लाडक्या बहिणींना मिळणार मोफत गॅस सिलेंडर येथे बघा अर्ज प्रक्रिया

 

खरिप २०२४ हंगामात पीक विम्यात शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित विमा भरपाई या ४ ट्रिगर अंतर्गत भरपाई मंजूर झाली आहे. शेतकऱ्यांना एकूण २ हजार ३०८ कोटी रुपये भरपाई मिळणार आहे. हंगामातील प्रतिकूल परिस्थितीअंतर्गत १८ लाख ८४ हजार शेतकऱ्यांना ७०६ कोटी रुपये तर काढणी पश्चात नुकसान भरपाईतून १ लाख ४८ लाख शेतकऱ्यांना १४१ कोटी भरपाई मिळणार आहे.

Leave a Comment