सरकार देत आहे 15 ते 50 लाख रुपये पर्यंत कर्ज सरकार भरणार तुमचे व्याज इथे जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

नमस्कार मित्रांनो राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागास, विशेषतः मराठा समाजातील बेरोजगार युवक-युवतींना उद्योजकतेकडे वळवण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी .

महाराष्ट्र शासनाच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत व्याज परतावा योजना राबविली जातेही योजना सुरु झाल्यापासून राज्यातील लाखो बेरोजगारांना व्यवसायासाठी आवश्यक भांडवली कर्ज मिळवून देण्यात मदत झाली असून, कर्जाच्या व्याजावर शासनाकडून परतावा दिला जातो.

येथे क्लिक करून बघा अर्ज कुठे करायचा

 

आतापर्यंत या योजनेंतर्गत तब्बल १ लाख ३५ हजार २६३ लाभार्थ्यांना थेट फायदा मिळाला आहे. योजनेअंतर्गत बँकांनी मिळून आतापर्यंत १२ हजार ४०५ कोटी ७० लाख रुपयांचे कर्ज वितरित केले असून, ही योजना अनेक तरुणांचे आयुष्य घडवणारी ठरत आहे.या योजनेचा उद्देश केवळ आर्थिक मदत पुरवणे नाही, तर बेरोजगारी कमी करून ग्रामीण आणि शहरी भागात लघु उद्योगांना चालना देणे आहे. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा व गट कर्ज व्याज परतावा अशा दोन प्रकारांत ही योजना कार्यान्वित आहे. वैयक्तिक कर्ज योजनेत १५ लाखांपर्यंत आणि गट योजनेत ५० लाखांपर्यंतच्या कर्जावर ७ वर्षे व्याज परतावा मिळतो. ज्या युवकांनी बँक कर्ज घेऊन नियमानुसार मुद्दल परतफेड केली आहे, त्यांना महामंडळाकडून व्याजाची रक्कम परत केली जातेयोजनेतून शेतीला पूरक व्यवसायांना प्रोत्साहन दिले जाते. उदाहरणार्थ, शेळी-मेंढी पालन, कुक्कुटपालन, गाई-म्हशींचे पालन, तसेच ट्रॅक्टर खरेदी, मालवाहतूक, प्रवासी वाहतूक आणि अन्न प्रक्रिया उद्योगासाठी कर्ज मिळू शकते. या योजनांचा उद्देश केवळ आर्थिक मदत नाही, तर स्थानिक पातळीवर उत्पादनक्षमता वाढवून रोजगारनिर्मिती करणे देखील आहे.

येथे क्लिक करून बघा अर्ज कुठे करायचा

Leave a Comment