तुम्ही घेऊ शकता योजनेचा लाभ
अर्ज करणारी महिला महाराष्ट्रातली असावी
ती अनुसूचित जाती किंवा जमातीची असावी
वय १८ ते ६० वर्षांच्या दरम्यान असावे
तिच्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न १.२० लाखांपेक्षा कमी असावे
ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांना आधी संधी दिली जाते
अर्ज करताना लागणारी कागदपत्रे
या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेला काही कागदपत्रं द्यावी लागतात:
आधार कार्ड
जात प्रमाणपत्र
रेशन कार्ड
उत्पन्नाचा दाखला
रहिवासी प्रमाणपत्र
बँकेचे पासबुक
गिरणी खरेदीसाठी कोटेशन (गिरणी किती रुपयांना मिळणार आहे ते लिहिलेला कागद)
योजनेतून काय फायदे होतात?
गिरणी मिळाल्यावर महिला घराजवळ पीठ दळण्याचा व्यवसाय सुरू करू शकतात. गावात अशा सेवा फार कमी असतात, त्यामुळे अनेक लोक पीठ दळण्यासाठी त्यांच्या गिरणीकडे येतात. यामुळे महिलेला रोज काहीतरी उत्पन्न मिळतं. जर व्यवसाय चांगला चालला, तर त्या मोठ्या प्रमाणात पीठ तयार करून विकू शकतात आणि जास्त पैसे मिळवू शकतात.