हे सुद्धा वाचा:- घरबसल्या मिळवा मोबाईलवर 50 हजार रुपये कर्ज अशाप्रकारे करा अर्ज येथे बघा
हे सुद्धा वाचा:- घरबसल्या मिळवा मोबाईलवर 50 हजार रुपये कर्ज अशाप्रकारे करा अर्ज येथे बघा
सध्या ग्रामीण भागात ‘व्हर्जन-२’ राबविण्यात येत आहे.भूमिअभिलेखचे व्हर्जन-१ हे प्रोग्रॅमिंग सॉफ्टवेअर होते, तर नवे व्हर्जन-२ हे जीआयएस आधारित असून, जीपीएस यंत्रणेशी संलग्न असणाऱ्या रोव्हरने मोजणी करण्याची सुविधा आहे. यामुळे क्षेत्राच्या अक्षांश-रेखांशांची नोंद घेतली जाते.
२) तसेच मोजणीचे ‘क’ पत्रक व अन्य अहवाल उपलब्ध होतात. मोजणीबाबत शेतकऱ्यांना हरकती देखील नोंदविता येतात.संपूर्ण क्षेत्राची मोजणी झाल्यानंतर पुन्हा एखाद्या शेतकऱ्याने मोजणीसाठी अर्ज केल्यानंतर भूमिअभिलेख कार्यालयात रेकॉर्ड तपासण्याची गरज नाही.भूमिअभिलेख विभागाने मुंबई शहर वगळता संपूर्ण राज्यात तीन टप्प्यांत ई-मोजणीचे व्हर्जन -२ लागू केले आहे.- व्हर्जन-२ मध्ये रोव्हरच्या साहाय्याने मोजणी केली जाते.- अभिलेखातील रेकार्डप्रमाणे शेतकऱ्यांना हद्दीच्या खुणा करून दिल्या जातात.मोजणी पूर्ण झाल्यानंतर सॅटेलाइटला अक्षांश-रेखांश अपलोड होतात.- यामुळे भविष्यात इतर शेतकऱ्यांची मोजणी करत असताना पूर्वी केलेली मोजणी आणि हद्द यांचा आधार घेतला जातो.