10वी 12वी च्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर.! राज्य शिक्षण मंडळाने घेतला विद्यार्थ्यांसाठी हा मोठा निर्णय

नमस्कार मित्रांनो काही दिवसातच दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा सुरू होणार असून , या परीक्षेच्या काळात अनेक विद्यार्थी मानसिकदृष्ट्या दडपणाखाली असतात. अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी राज्य शालेय शिक्षण मंडळाने ऑनलाइन समुपदेशनाची सुविधा सुरू केली आहे.या समुपदेशाने विद्यार्थाना आलेलं टेन्शन , नैराश इत्यादी गोष्टीतून बाहेर काढले जाणार आहे.

 

 

हे सुद्धा वाचा:- राज्य सरकारचा मोठा निर्णय.! आता शेतकऱ्यांना मिळणार रेशन ऐवजी पैसे असा करा अर्ज

ज्यामुळे विद्यार्थाना व्यवस्थित परीक्षा देता येणार आहे. तर चला या बातमीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयातराज्य मंडळाने 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 या कालावधीत इयत्ता बारावी आणि 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 या कालावधीत इयत्ता दहावीच्या परीक्षांसाठी समुपदेशकांची नियुक्ती केली आहे. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या विभागीय मंडळांमार्फत या परीक्षा घेतल्या जातील.समुपदेशक विद्यार्थ्यांना व पालकांना परीक्षा संबंधित मानसिक दडपणावर मात करण्यासाठी मार्गदर्शन करतील. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या आधी आणि परीक्षेच्या कालावधीत सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत भ्रमणध्वनीद्वारे निशुल्क समुपदेशन दिले जाईल.

हे सुद्धा वाचा:- राज्य सरकारचा मोठा निर्णय.! आता शेतकऱ्यांना मिळणार रेशन ऐवजी पैसे असा करा अर्ज

 

या सेवेचा वापर विद्यार्थ्यांनी आपल्या मानसिकतेवर ताण कमी करण्यासाठी आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी करावा, असे राज्य मंडळाचे सचिव डॉ. माधुरी सावरकर यांच्याकडून सांगण्यात आले आहे.विद्यार्थी आणि पालकांनी समुपदेशकांना परीक्षा केंद्र, बैठक व्यवस्था किंवा प्रश्नपत्रिका यासंबंधी प्रश्न विचारू नयेत, असेही त्यांनी सांगितले आहे. शासनाचा हा निर्णय विद्यार्थी आणि पालकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. या समुपदेशन सेवा विद्यार्थ्यांना मानसिक ताण आणि परीक्षेच्या भीतीवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतील. विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी या उपक्रमाची आवश्यकता अत्यंत महत्वाची आहे, असे देखील सांगण्यात आले आहे.

1) 9011302997
2) 8263876896
3) 8767753069
4) 7387400970
5 ) 9960644411
6) 7208775115
7) 8169202214
8) 9834084593
9) 8329230022
10) 9552982115

Leave a Comment