मोठी बातमी.! या लाडक्या बहिणींना सरकारला करावे लागणार 10,500 रुपये परत यादीत नाव बघा February 4, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सरकारने लाभार्थी महिलांची अर्जाची छाननी सूरू केली आहे. या छाननीमध्ये ज्या महिलांनी निकषांना डावलून योजनेचा लाभ घेतला आहे. महिलांना योजनेचे पैसे परत करावे लागणार आहे. यासाठी सरकार महिलांना आवाहन देखील करत आहेत. हे सुद्धा वाचा:- शेतकऱ्यांसाठी खुशखबर.! सरकार देत आहे शेतकऱ्यांना 5 लाख रुपये कर्ज अशाप्रकारे करा अर्ज अशात आता सरकारने या अर्जाच्या छाननी प्रक्रियेला आणखीणच वेग दिला आहे. त्यानुसार आता सरकार अंगणवाडी सेविकांना लाभार्थी महिलांच्या घरोघरी पाठवणार आहे. अंगणवाडी सेविकांच्या या पडताळणती जर महिला निकष डावलून लाभ घेत असल्याचे समोर आले तर त्यांना आतापर्यंत खात्यात आलेले 10 हजार 500 रूपये सरकारला परत करावे लागणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना मोठा झटका बसला आहे.खरं तर महिला व बाल कल्याण विभागाने लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या अर्जाची छाननी सूरू आहे. या छाननीसाठी आयकर आणि परिवहन विभागाची मदत घेतली जाणार आहे. आयकर विभाग महिलांच्या पैशांचे विवरण सांगणार आहे. तर परिवहन विभाग महिला राहत असलेल्या घरात चारचाकी आहे की नाही? याची माहिती देणार आहे. या दरम्यानच आता सरकारने अर्जांच्या छाननीला आणखी वेग दिला आहे.सरकार आला थेट अंगणवाडी सेविकांना लाभार्थी महिलांच्या घरी पाठवणार आहे. हे सुद्धा वाचा:- शेतकऱ्यांसाठी खुशखबर.! सरकार देत आहे शेतकऱ्यांना 5 लाख रुपये कर्ज अशाप्रकारे करा अर्ज चारचाकी वाहन असणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्याचा निर्णय याआधीच घेण्यात आला होता. या संदर्भात सरकार परिवहन विभागाकडून देखील माहिती मिळवत होती. त्यानंतर आता सरकार अंगणवाडी सेविकांना लाभार्थी महिलांच्या घरी पाठवणार आहे. यावेळी अंगणवाडी सेविकांच्या पडताळणीत जर महिलांच्या कुटुंबात चारचाकी असेल त्यांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार आहे. त्यामुळे या महिलांना मोठा धक्का बसणार असून त्यांना योजनेचे पैसे परत करावे लागणार आहे.मिळालेल्या माहितीनुसार सासरे, दीर, अथवा घरातील इतरांच्या नावावर चारचाकी असेल आणि लाभार्थी महिला पती आणि मुलासोबत वेगळी राहत असेल तर या महिलेला योजनेचा लाभ सूरूच राहणार आहे.दरम्यान लाडकी बहीण योजनेची सुरूवात जुनपासून करण्यात आली होती.त्यानंतर जुलैपासून महिलांच्या खात्यात सरकारने 1500 रूपये जमा करायला सुरूवात केली होती.आतापर्यंत महिलांच्या खात्यात सात हप्त्याचे 10 हजार 500 रूपये खात्यात जमा झाले आहेत. आता महिलांना फेब्रुवारी महिन्यात येणाऱ्या 1500 रूपयांची प्रतिक्षा आहे. हे पैसे कदाचित फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे.दरम्यान हे पैसे खात्यात येईपर्यंत जर अर्ज बाद झाला तर सर्व पैसे परत करावे लागण्याची शक्यता आहे.