वर्षभरात कोणाला किती मिळाले अनुदान?
मागील वर्षभरात जिल्ह्यात आठ तालुक्यांमध्ये कन्यादान योजनेंतर्गत सामूहिक विवाह सोहळे झाले नाहीत. त्यामुळे कुणीच अनुदानास पात्र ठरले नाही.
संस्थांना चार हजार, दाम्पत्याला २० हजार
कन्यादान योजनेअंतर्गत विवाह सोहळा पार पाडणाऱ्या संस्थांना प्रति जोडपे ४ हजार रुपये, तर दाम्पत्याला २० हजार रुपयांचे अनुदान दिले
संस्थांना चार हजार, दाम्पत्याला २० हजार
कन्यादान योजनेअंतर्गत विवाह सोहळा पार पाडणाऱ्या संस्थांना प्रति जोडपे ४ हजार रुपये, तर दाम्पत्याला २० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते.
काय आहे कन्यादान योजना?
मागासवर्गीय कुटुंबातील विवाह वाढत्या महागाईत कमी खर्चात व्हावे, यासाठी सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी कन्यादान योजना सुरू केलेली आहे.
या योजनेंतर्गत दाम्पत्य व संस्थांनाही मदत दिली जाते. सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाकडून ही योजना राबविली जाते
गरीब कुटुंबांना मदत
गरीब कुटुंबातील मुला-मुलींचे विवाह करण्यासाठी कन्यादान योजना साहाय्यकारी ठरते. सदर योजनेच्या माध्यमातून विवाह सोहळा थाटात पार पाडला जातो. दाम्पत्याला संसारोपयोगी साहित्यासाठी अनुदान दिले जाते.
काय आहेत अटी?
कन्यादान योजनेत सहभागी होण्यासाठी वधू-वरांचे वय कायद्याच्या चौकटीत बसणारे असावे. तसेच पालकांकडून तसे संमतीपत्र सादर करणे आवश्यक आहे. संस्था ही नोंदणीकृत असावी, तेव्हाच सदर संस्था कन्यादान योजनेसाठी पात्र ठरते.