राज्य सरकारचा मोठा निर्णय.! कर्मचाऱ्यांना वयाच्या सत्तरीनंतर करता येणार काम मिळणार ८० हजार पगार June 12, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. निवृत्तीनंतरही सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरी करण्याची संधी मिळणार आहे .राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातील सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. निवृत्तीचं वय उलटून गेलेल्या कर्मचाऱ्यांना सरकारकडून कंत्राटी भरतीनुसार सेवेत घेता येईल, असा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे 58 व्या वर्षी निवृत्त होणारे कर्मचारी आता वयाच्या 70 वर्षांपर्यंत सेवेत राहू शकतील. हे सुद्धा वाचा: खाद्यतेल झाले इतक्या रुपयाने स्वस्त येथे क्लिक करून नवीन दर बघा शासकीय आणि निमशासकीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना विविध विभागांमध्ये कंत्राटी पद्धतीने रुजू करून घेण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय 58 वरून 60 वर्षे करण्याचा निर्णय अद्याप झाला नसला, तरी या नव्या निर्णयामुळे सेवानिवृत्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. नव्या धोरणानुसार, निवृत्तीनंतर कर्मचारी वयाच्या 65 वर्षांपर्यंत आणि त्यानंतरही त्यांची क्षमता असल्यास वयाच्या 70 वर्षांपर्यंत काम करू शकतील.या निर्णयामध्ये काही अटीही ठेवण्यात आल्या आहेत. या संधीचा लाभ केवळ ‘अ’ आणि ‘ब’ गट संवर्गातील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनाच घेता येईल. गट ‘क’ आणि गट ‘ड’ मधील कर्मचाऱ्यांना मात्र निवृत्तीनंतर कंत्राटी पद्धतीने पुन्हा नियुक्त करता येणार नाही. तसेच, ज्या अधिकाऱ्यांवर कोणतीही विभागीय चौकशी (Departmental Enquiry) सुरू असेल हे सुद्धा वाचा: खाद्यतेल झाले इतक्या रुपयाने स्वस्त येथे क्लिक करून नवीन दर बघा , त्यांना निवृत्तीनंतर कंत्राटी पद्धतीने सेवेत घेता येणार नाही. पुन्हा सेवेत रुजू होणाऱ्या या अधिकाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीच्या वेळी असलेले मूळ निवृत्तीवेतन (Basic Pension) आणि इतर भत्ते दिले जातील.राज्य सरकारच्या आस्थापनांमध्ये एकूण पदांच्या 10 टक्के पदांवर सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. या नियुक्त होणाऱ्या अधिकाऱ्यांना दरमहा 80 हजार रुपयांपर्यंत वेतन देण्याची तरतूद करण्यात आली आहे. याचा अर्थ असा की एखाद्या व्यक्तीचे निवृत्तीचे वय 58 असले तरी, शारीरिक क्षमता उत्तम असल्यास, त्याला वयाच्या 70 व्या वर्षापर्यंत दरमहा 80 हजार रुपयांपर्यंतची नोकरी करता येणार आहे.