सर्वप्रथम पी एम किसानच्या https://pmkisan.gov.in/Pmkisanbenefitsurrender_revocation.aspx अधिकृत पोर्टलवर जायचं आहे.

या ठिकाणी Farmers Corner या विंडोवरील Voluntary Surrender Revocation या पर्यायावर क्लिक करायचा आहे.

या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपला आधार नंबर किंवा नोंदणी क्रमांक टाकून Get OTP या पर्यायावर क्लिक करायचा आहे.

ओटीपी आल्यानंतर खाली दिलेल्या बॉक्स वर प्रविष्ट करून Verify ओटीपी वर क्लिक करायचा आहे.

यानंतर संबंधित शेतकऱ्याची माहिती समोरच्या विंडोवर दिसेल.त्याखाली एक स्वयंघोषणापत्र देण्यात आला आहे, त्यावर क्लिक करायचे आहे. त्याचबरोबर आपल्याला विचारण्यात येईल की आपल्याला आपले खाते पुन्हा सुरू करायचे आहे का? त्यावर Yes असा पर्याय निवडायचा आहे.

त्यानंतर Proceed For E Kyc या पर्यायावर क्लिक करायचा आहे.

पुढील विंडोवर अटी शर्थीचे एक Page दिसून येईल, यावर क्लिक करून Submit करायचे आहे.

यानंतर पुन्हा आपल्या आधार संलग्न मोबाईल नंबरवर ओटीपी पाठवण्यात येईल. हा ओटीपी व्हेरिफाय केल्यानंतर आपले खाते पुन्हा एकदा चालू झाल्याचा मेसेज मोबाईलवर येईल.

अशा पद्धतीने ज्या शेतकऱ्यांनी आपले खाते अनावधानाने बंद केले असेल. त्यांना पुन्हा एकदा चालू करण्याची संधी पीएम किसानच्या माध्यमातून देण्यात आली आहे.