कर्ज मिळवण्यासाठीच्या नियम अटी काय आहेत?

1) एसबीआय जमीन खरेदी योजनेअंतर्गत कर्जासाठी अर्जदाराकडे कोणत्याही प्रकारचे थकित कर्ज नसावे.

2) या योजनेअंतर्गत अर्जदाराचा कर्ज परतफेड करण्याचा किमान 2 वर्षांचा चांगला रेकॉर्ड असावा.

3) इतर बँकांचे चांगले कर्जदार देखील अर्ज करू शकतात, परंतु यासाठी त्यांनी इतर बँकांचे कर्ज फेडलेले असावे. शेतकऱ्यांना शेती खरेदीसाठी कर्ज मिळू शकते.

4) जमिनीच्या मूल्यांकन केलेल्या किंमतीच्या ८५ टक्के रक्कम कर्ज म्हणून उपलब्ध आहे, जे जास्तीत जास्त ५ लाख रुपये आहे.

6) या योजनेअंतर्गत भूमिहीन शेतकरी कर्जासाठी अर्ज करू शकतात.

7) 5 एकरपेक्षा कमी सिंचनाखालील जमीन असलेले शेतकरी देखील या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात.

8) शेतकरी जमिनीवर उत्पादन सुरू होण्यापूर्वी या निर्धारित मोकळ्या वेळेत शेतकऱ्याला कोणताही हप्ता भरावा लागणार नाही. या योजनेअंतर्गत, शेतकरी जमिनीवर उत्पादन सुरू झाल्यापासून जास्तीत जास्त 9 ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी सहामाही हप्त्यांमध्ये कर्ज परतफेड करू शकतात.